माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, April 30, 2012

अंबिकादेवी देवस्थान: देवी भोयरे (जि. अहमदनगर)

देवीभोयरे या छोटयाशा गावातील श्री अंबि‍का देवीचे हे पवि‍त्र स्वयंभू स्थान जागृत देवस्थान आहे. माहूरची श्री रेणुकामाता या ठि‍काणी तादुंळाकार पाषाण मूर्ति‍च्या स्वरूपात स्वयंभू प्रगट झालेली असून ती दक्षि‍णभि‍मुखी आहे. दक्षि‍णेकडे मुख असलेली देवस्था‍ने जागृत असल्याचे मानण्यात येते. या स्थानाची उत्‍त्पतीची‍ कथा वि‍स्मयकारक आहे.

क्षीरसागर हे गावातील प्रति‍ष्ठि‍‍त ब्राम्‍हण घराणे. माहूरची श्री रेणुकामाता हे त्यांचे कुलदैवत. या घराण्याचे मूळ पुरूष रेणुकामातेच्या नि‍स्सीम भक्तीपोटी नवरात्रामध्ये माहूरगडाची वारी नि‍यमि‍तपणे करीत असत. त्याकाळी हा दूरचा प्रवास अति‍शय खडतर असे. पुढे वार्धक्यामुळे त्यांना हा जि‍कीरीचा प्रवास झेपेनासा झाल्यामुळे वारीचा त्यांचा नि‍त्यनेम खंडि‍त झाला. त्यांमुळे अति‍शय व्यथि‍त होऊन त्यांना रेणुकामातेच्या दर्शनाची तळमळ लागून राहि‍ली. आणि‍ काय आश्चर्य—श्री रेणुकामातेने सतत तीन दि‍वस त्यांना स्वप्न दृष्टांत देवून ‘’मीच तुला दर्शन द्यावयास आले आहे.’’असे सांगून वि‍शि‍ष्ट जागा दाखवि‍ली आणि‍ त्या ठि‍काणी खणल्यास ‘’मी प्रगट होईन’’असे संकेत दि‍ले. तेच हे पवि‍त्र स्थान की जेथे स्वप्न दृष्टांतानुसार खणल्यासनंतर श्री अंबि‍केची तांदुळाकार पाषाण मूर्ति‍-(‘’तांदळाजमि‍नीमधून म्हणजे भुयारामधून स्व यंभू प्रगट झाली. या मूर्ति‍भोवती हळदीकुंकवाच्या- पेटयाही आढळून आल्या.

या ठि‍काणी श्रीरेणुकामाता भुयारातून म्हणजे भूवि‍वरातून प्रगट झाली म्हणून गावाला देवीभूवि‍वर असे नाव प्राप्‍त झाले. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन गावाचे नाव 'देवीभोयरे' असे रूढ झाले.
श्रीक्षेत्र देवीभोयरे श्री. अंबिकादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात, अहमदनगर जिल्‍‍हयात, पारनेर तालुक्यात आहे. पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला पारनेर पासून 18 कि. मी. वर व शिरूर पासून 24 कि.मी. अंतरावर देवीभोयरे हे क्षेत्र आहे.
पुणे ते शिरूर, शिरुर ते कल्याण (मुंबई), नगर पारनेर देवीभोयरे इत्यादी ठिकाणी सर्व डांबरी रस्ता आहे. पुणे मुंबईतून शिरूर कडे जाणा-या अनेक एस. टी. बसेस आहेत. त्या सर्व देविभोयरे येथे थांबतात. तसेच अहमदनगर येथुनही सुपे मार्गे अनेक बसेस उपलब्ध आहेत.  

संदर्भ: http://www.devibhoyare.com

छायाचित्रे:

दीपस्तंभ

मुख्य प्रवेशद्वार

मंदीराची मागील बाजू

वड व पिंपळाचे एकत्रित झाड

देवीभोयरे देवस्थान

देवी


Sunday, April 29, 2012

बुद्ध स्मारक: नाशिक

स्थळ: बुद्ध स्मारक नाशिक.

ठिकाण: पांडवलेणी पायथ्यापाशी (नाशिकपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर, मुंबई रस्ता)

जाण्यासाठी नाशिकच्या निमाणी बस-स्थानकावरून दर २० मिनिटांनी ’पांडवलेणी’ बस जाते.


छायाचित्रे:

बुद्ध स्मारक (वॉलपेपर)



बुद्धमूर्ती


बु्द्धस्मारक (बाह्यचित्र)



बु्द्धस्मारक (बाह्यचित्र)


नाशकातील चार प्रेक्षणीय स्थळे एकाच ठिकाणी: फाळके स्मारक, बुद्ध स्मारक, वॉटर पार्क व पांडव लेणी 
Search tags: buddha smarak nashik, buddha memorial nashik.

तोरणा: एक थरारक प्रवास

ढगांत हरविलेला तोरणा
छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशिवाय इतिहासात त्याची फारशी नोंद आठवत नाही. शिवाजीराजे गेल्यानंतर दहा वर्षे हा किल्ला राजे संभाजींच्या ताब्यात होता. शिवाजीराजांनी सर्वप्रथम जिंकलेला किल्ला पाहण्याची उत्सुकता ही प्रत्येक शिवप्रेमीला असते. त्याला राजांनीच प्रचंडगड असे नाव दिले होते. स्वत: शिवाजीराजांनी असे नाव दिल्याने हा किल्ला किती प्रचंड असेल, याचा अंदाज हा किल्ला पाहिल्यावर येतोच. 


पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच गड म्हणून तोरणा नावाजलेला आहे. वेल्हे गावात व अर्थात याच तालुक्यात हा गड येतो. त्याचे पुण्यापासूनचे अंतर आहे ४२ किलोमीटर. सिंहगड रस्ता संपल्यावर सिंहगडाच्या पायथ्याशी उजव्या बाजूला एक खानापूरकडे जाणारा रस्ता आहे. त्याच रस्त्याने वेल्हे गावाकडे जाता येते. हा रस्ता पुढे राजगडालाही जाऊन मिळातो. सिंहगडापासून तोरणा गड हा रस्त्याने २२ किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याला लागणाऱ्या पाबे ह्या गावापासून डावीकडे राजगडला तीन किमी. तर उजवीकडे पाच किलोमीटरवर तोरणा गड गाठता येतो. गाडी केवळ किल्याच्या पायथ्यापर्यंतच जाऊ शकते. स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच कारण पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून वेल्हे गावात जाण्यासाठी गाड्या खूप कमी आहेत. पावसाळ्यात तोरणा बघण्याची मजा काही औरच असते. पायथ्यापासून अशा वातावरणात किल्ल्याचा बुरूज दिसणे हे महाकठीण आहे. या काळात त्याचा बुरूज हा धुक्यात हरविलेला असतो. समुद्रसपाटीपासून गडाचे टोक चार हजार फूट उंच आहे. शिवाय गड गाठण्यासाठी पायथ्यापासून दोन डोंगर पार करून जावे लागते. पहिल्या डोंगराची चढाई फारशी कठीण नाही. खरा कस लागतो तो मूळ किल्ला चढण्यासच! तत्पूर्वी उंचीवरून वेगाने वाहणारे वाऱ्यांना कसेबसे सामोरे जावे लागते. पावसाळ्यात त्यांचा वेग जास्त असतो. या ठिकाणावरून आपण अतिशय मोठा किल्ला चढत आहोत, याची नक्कीच प्रचिती येते. मूळ किल्ला चढाईस थोडासा अवघड आहे. पावसाळ्यात घसरणीचा त्रास होऊ शकतो. परंतु, त्यासाठी आधीच मानसिक तयारी केली असली पाहिजे. जसजसे किल्ला चढत जातो तसतसे धुक्याचे प्रमाण वाढत जाते व खालचे काहीच दिसत नाही. आणखी काहीसे वर गेल्यावर तिथे आधारासाठी रेलिंग्जची व्यवस्था केली गेलेली आहे. तोच एकमेव आधार गड चढताना घ्यावा लागतो. ह्या अवघड वाटेचा अंदाज आल्यावर पूर्वी घोडे किल्यावर कसे नेत असतील? ह्याचा विचार नक्कीच आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. किल्ला चढण्यास साधारणत: दोन तासांचा अवधी लागतो. पावसाळी वातावरणात गडावरील परिसर हा प्रफुल्लीत झालेला दिसतो. गडावर पाहण्यासारखी तोरणजाई मंदिर, मेंगाई मंदिर, बुधलामाची, झुंजारमाची अशी ठिकाणे आहेत. पावसात त्याची मजा काही औरच असते. पाऊस नसताना येथुन होणारे राजगडाचे दर्शन मात्र निश्चित सुखावून जाते.

छायाचित्रे:
वेल्हे गावातून दिसणारा तोरणा





तोरणाकडे जाणारी वाट


डावीकडून: मी, प्रतिक आवटे, अमोल कुटे, अमित कुटे, ईशान पवार