आज आमची कन्या ज्ञानेश्वरीने नववा किल्ला सर केला. ती अडीच वर्षांची आहे. दर किल्ल्यागणिक तिचा उत्साह आणि वेग वाढतच चाललाय. शंभू जन्मभूमी असलेला पुणे जिल्ह्यातील 'पुरंदर किल्ला' तसा अतिशय उंच आहे. निम्म्या किल्ल्यापर्यंत गाडी जाते. तिथून पुढे साधारणतः अर्धा-पाऊण तासात आपण बालेकिल्ल्यावर पोहचू शकतो. ही चढण तिने या वेळेतच पूर्ण केली. शिवाय ढग विरळ होत असल्याने अधूनमधून ऊनही पडत होते. वातावरण बऱ्यापैकी स्वच्छ होते. त्यामुळे किल्ला सर करताना थोडीशी कसरतही करावी लागली.