सांगली जिल्ह्यातील एक सुंदर किल्ला म्हणजे मच्छिन्द्रगड! शिवरायांनी स्वतः जातीने बांधून घेतलेला किल्ला म्हणून हा दुर्ग परिचित आहे. इस्लामपूर पासून पंधरा किलोमीटरवर हा किल्ला स्थित आहे. बेरडमाची आणि येडेमच्छिन्द्र या दोन्ही गावांतून किल्ल्यावर जायला भक्कम पायरीवाटा आहेत. शिवाय येडेमच्छिन्द्र मधून काँक्रीट चा गाडीरस्ताही तयार झालेला आहे. किल्ल्याचे अवशेष अजूनही बऱ्यापैकी शिल्लक दिसतात.
No comments:
Post a Comment