माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, April 3, 2019

नांदेडचा भग्न नंदगिरी किल्ला

महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात भुईकोट किल्ले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिकचा भाग वगळला, तर इतर सर्व भागांमध्ये बहुतांश किल्ले भुईकोट आहेत. पूर्वीच्या काळी अनेक शहरांची ओळख की तिथल्या भुईकोट किल्ल्यावरून होती. त्यातीलच एक किल्ला म्हणजे नांदेड चा नंदगिरी अर्थात नंदीग्राम किल्ला होय! नांदेड शहराचे नाव याच किल्ल्यावरून देण्यात आल्याचे मानण्यात येते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा किल्ला वसलेला आहे. अर्थात याच कारणामुळे किल्ल्याची अतिशय दुरावस्था झाल्याचे दिसते. गोदावरीच्या काठावर आज हा किल्ला भग्नावस्थेत आढळलेला दिसतो.  महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचे किल्ले अंगाखांद्यावर खेळवत आहेत, परंतु भुईकोट किल्ल्यांच्या माध्यमातून अतिशय वेगाने आपला इतिहास नामशेष होत असल्याचा दिसतो. आज नांदेडचा नंदगिरी किल्ला महानगरपालिकेच्या पाणी विभागाच्या ताब्यात आहे. तो आता सार्वजनिक ठिकाणी असल्यामुळे आणि एका ओसाड जागी असल्यामुळे त्याची भयानक दुरावस्था झाल्याचे दिसते. आधीच या भागांमध्ये पर्यटन स्थळांची संख्या कमी आहे. त्यातच नागरिकांनी या किल्ल्यांची दुरावस्था केल्यास पर्यटनाला वाव निश्चितच मिळणार नाही..








No comments:

Post a Comment