सकाळी रत्नागिरीच्या मुरुड गावामध्ये पोहोचलो, त्यादिवशी सुट्टीचा दिवस नसल्यामुळे गावात पर्यटकांची फारशी रेलचेल नव्हती. गावातील जिल्हा परिषद शाळा महर्षी कर्वे यांच्या नावाने उभारलेली आहे. या शाळेच्या जवळच त्यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्या दिवशी या पुतळ्याभोवती फुलांची आरास केलेली होती. तेव्हा समजले की आज महर्षी कर्वे यांची जयंती आहे. भारतरत्न मिळालेल्या या महान व्यक्तीच्या गावात त्यादिवशी आम्ही पहिल्यांदाच आलो. कोकणाने या देशाला अनेक मोठी व्यक्तिमत्वे दिलेली आहेत. त्यातीलच एक महर्षी कर्वे होय. स्त्री शिक्षणच्या प्रणेत्यांपैकी एक असणाऱ्या कर्वे यांच्या मुरुड गावात काही विसाव्याचे क्षण घालवले.
No comments:
Post a Comment