सन 2006 मध्ये सर्वप्रथम पाबळला जाण्याचा योग
आला होता. त्याच वेळेस पहिल्यांदा पाबळ गावात मस्तानीची कबर आहे, असे
समजले. परंतु, तेव्हा भेट दिली नव्हती. मागील आठवड्यात इतक्या वर्षांनी
पाबळला जाताना हे ठिकाण पाहण्याची संधी मिळाली. पुणे जिल्ह्यातल्या
राजगुरुनगरपासून पाबळ गाव वीस किलोमीटर अंतरावर आहे. या गावामधल्या लोणी
रस्त्यावर डाव्या बाजूला बाजीराव पेशव्यांच्या मस्तानी बाईसाहेबांची समाधी
बाहेर एकाकी पडल्याचे दिसते. त्या शेजारीच गावचे सुन्नी कब्रस्तान आहे.
मस्तानीच्या कबरीभोवती सध्या सिमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे व चबुतराही
बांधलेला आहे. परंतु सध्याची त्याची अवस्था पाहता महाराष्ट्रातल्या एका
दुर्लक्षित स्थळांपैकीच हे एक ठिकाण असल्याचे जाणवते.
No comments:
Post a Comment