कोल्हापुरातून गाडी चार्ज करून निघालो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजत आले होते. कागल-निपाणी-आजरा मार्गे अंबोली घाटातून आज वेंगुर्ल्याला पोहोचायचे होते. महामार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामे चालू असल्याने पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केलेली होती, त्यामुळे वाहतूक बऱ्यापैकी मंदावलेली दिसून आली. याच कारणास्तव कोकणात गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी उशीर व्हायला लागला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश केला तेव्हा पूर्ण अंधार झाला होता. आंबोलीच्या वळणावळणाच्या जंगलातून आम्ही प्रवास करत चाललो होतो. एव्हाना या रस्त्यांवरील वाहतूक देखील अतिशय तुरळक झाली होती. पोहोचायला उशीर होत असल्याने वेंगुर्लेऐवजी सावंतवाडीलाच थांबू असा विचार आम्ही केला.
यावेळी पहिल्यांदाच मोठ्या घाटप्रवासामध्ये ईव्ही गाडी आम्ही घेऊन गेलो होतो. आंबोली घाट सुरू झाला तेव्हा गाडीची रेंज १५७ किलोमीटर दाखवत होते. इथून सावंतवाडी जवळपास ३० किलोमीटर अंतरावर राहिले होते. घाटामध्ये प्रवास करताना बहुदा एक्सलरेटर जास्त वापरायची गरज पडली नाही. आणि रस्ता पूर्णपणे उताराचा होता. जवळपास एक तासानंतर आम्ही सावंतवाडीमध्ये पोहोचलो. त्यावेळी गाडीची उरलेली रेंज वाढवून तब्बल १८० किलोमीटरची झाली होती. म्हणजेच उताराच्या या रस्त्यावर रीजनरेशनमुळे गाडीची रेंज तब्बल २३ किलोमीटरने वाढली होती! शिवाय आजपर्यंत सर्वात कमी ऊर्जा या प्रवासामध्ये लागल्याचे दिसले. ११५ वॅट प्रतिकिलोमीटरने आमचा हा प्रवास झाला होता. एकंदरीत ऊर्जा मिळवण्यासाठी गाडीने उताराच्या या रस्त्याचा अतिशय सुयोग्य वापर केल्याचे दिसून आले!
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Friday, January 31, 2025
आंबोली घाटातून सावंतवाडी
Subscribe to:
Posts (Atom)