पुण्याहून अलिबागला निघायच्या आधी आजूबाजूला कोणकोणते समुद्रकिनारे आहेत,
याची गुगल मॅप वर माहिती काढून घेतली होती. त्यात रेवदंडा बीच पहिल्या
क्रमांकावर होता. त्याची बरीच माहिती जमवली होती. शिवाय याच रेवदंड्याला
किल्लाही असल्याने हा बीच करायचाच ठरवले होते. अलिबागच्या परतीच्या
प्रवासात केलेला हा बीच होय. अलिबागहून निघालो व थेट रेवदंड्याला पोहोचलो.
रेवदंडा गावातून एक रस्ता समुद्राच्या दिशेने जातो. नेहमीसारखी नारळाची दाट
झाडी व त्यातून दिसणारा रेवदंडा समुद्रकिनारा फारच मनोहारी होता. बीचवर
तशी काही गर्दी नव्हती. सकाळी ढगाआड गेलेला सूर्य बाहेर आलेला व भरतीचे
पाणी आता बऱ्यापैकी शांत झाले होते. त्यामुळे हा समुद्रकिनाराही
शांत-निवांत असाच भासला. दुपारच्या उन्हात समुद्राची निळेशार पाणी
निसर्गचित्र तयार करीत होते. त्यामुळे समुद्रकिनार्याची खरी मजा येते
लुटता आली. येथून समोरच कोरलाई किल्ला दिसतो. समुद्रकिनाऱ्यावरील गिरिदुर्ग
असल्याने या वेळी जाऊन बराच उशीर झाला असता. त्यामुळे हा मार्ग आम्ही
निवडला नाही. बाकी या दौऱ्यात पाहिलेल्या तिन्ही समुद्रकिनाऱ्यामध्ये
सर्वात स्वच्छ किनारा म्हणून रेवदंडा चे नाव घेता येईल.
No comments:
Post a Comment