बीचवर फिरायचं याच उद्देशाने अलिबागला गेलो. परंतु समुद्राला ओहोटी
असल्याने संध्याकाळी त्याचं त्याचं पाणी खूप खोल गेले होतं. त्यामुळे
आलिबाग समुद्रकिनाऱ्यावर समुद्रातल्या त्या पाण्याशी भेट झाली नव्हती!
त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून इथून सात किलोमीटर असणाऱ्या नागाव
समुद्र किनार्यावर जायचे आम्ही ठरवले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता. परंतु
तरीही वातावरण ढगाळ झाले होते. कालच्या ओळखीमुळे कुलाबा किल्ला पूर्ण बघता
आला, त्याचे शल्य नव्हते. अलिबागच्या बाहेर आल्यावरच अस्सल कोकणी
शेतीतल्या नारळाच्या बागा दिसू लागल्या. तेव्हा पुढे कोकणचा 'फील' यायला
लागला होता. मागच्या त्या किनार्यावर मात्र तोबा गर्दी झाली होती. काल
कुणालाच अलिबागला पाणी दिसले नव्हते. त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी सकाळी
नागावला दिसली. बीच तसा नेहमीसारखाच, पण समुद्राला उधाण आले होते. शिवाय
ढगातून अधून-मधून सूर्यदेवाचे दर्शन व्हायचे. विशेष म्हणजे खग्रास
सूर्यग्रहणाचा तो काळ होता. नऊच्या दरम्यान सूर्याला ग्रहण लागणार होते.
फक्त एखाद्या सेकंदाकरिता त्या खग्रास ग्रहणाकडे मी पाहिले होते. ही एक
मोठी आठवण. बाकी बीच तर उत्तमच होता.
No comments:
Post a Comment