महाराष्ट्राच्या सीमेबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांचे वास्तव्य लाभलेला हा हैदराबादचा गोवळकोंडा किल्ला होय. शिवशाही आणि कुतुबशाहीमध्ये मैत्रीचे संबंध होते. दक्षिण दिग्विजय करण्यासाठी निघालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भागानगरच्या याच गोवळकोंडा किल्ल्यामध्ये कुतुबशहाची भेट घेतली होती. शिवस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला पाहताना मन भरून आले. शिवाजी महाराजांचा चरण स्पर्श या किल्ल्याला लाभलेला आहे. शिवाय जवळपास महिनाभर मराठ्यांचा राजा याच किल्ल्यावर वास्तव्यास होता. किल्ला पाहताना शिवकाळातील ही अनुभूती मन प्रसन्न करणारी ठरली.
No comments:
Post a Comment