आंबा घाट चढून वर आलं की अगदी काहीच अंतरावर उजव्या बाजूला एक रस्ता विशाळगड आणि पावनखिंडीच्या दिशेने जातो. सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून जाणारा वळणावळण्याचा रस्ता म्हणजे उन्हाळ्यात सुखद क्षणांची एक अनुभूतीच असते. जवळपास दहा किलोमीटरचा रस्ता हा सह्याद्रीच्या पूर्णपणे घनदाट जंगलातून जातो. अनेक ठिकाणी तर दिवसभरात सूर्याची किरणे देखील जमिनीवर पडत नसावीत, अशी परिस्थिती दिसते. ही जंगले निसर्गाचा समतोल टिकवून आहेत. शिवकाळात कदाचित याहीपेक्षा दाट झाडी या ठिकाणी असावी.
No comments:
Post a Comment