रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या सह्याद्रीतील जंगलांचा प्रवास करून आम्ही अनुस्कुरा घाटाच्या वाटेला लागलो. पायथ्यापर्यंतचे वातावरण स्वच्छ होतं. पाऊस पडून गेलेला आणि सगळीकडे हिरवाई पसरली होती. परंतु जसजसा घाट चढू लागलो तसतसे पाण्याची तुषार देखील कोसळायला लागले होते. घाटातील मंद धुके दृष्टीस पडायला लागले. ते कालांतराने अधिक गडद होत गेले. रस्त्यावर तशी फारशी गर्दी नव्हती. पावसाची रिमझिम अधून मधून परिसर ओलाचिंब करून जायची. धुक्यात हरवलेल्या या पहाडी रस्त्यांवरून प्रवास करताना निसर्गाच्या शांत आणि शीतल अनुभूतीचा आनंद घेता आला.
No comments:
Post a Comment