गणेशोत्सवाच्या काळामध्ये पहिल्यांदाच आम्ही गणपतीपुळ्यामध्ये आलो होतो. पण गावामध्ये नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती. अगदी शुकशुकाट म्हणावा असंच काहीतरी जाणवलं. त्या दिवशी राहण्याची खोली मात्र मनासारखी मिळाली होती. आता रात्रीच्या जेवणाची सोय करायची होती. बहुतांश हॉटेल्स बंद होते. कोकणामध्ये गणेशोत्सव हा व्यवसायाच्या दृष्टीने ‘ऑफ-सीजन’ असतो, असं म्हणायला हरकत नाही. कारण कोकणी लोक गणेशोत्सवाचे सर्व दिवस केवळ गणपतीच्या सेवेमध्ये मग्न असतात! अगदी गणपतीपुळ्यात देखील हाच अनुभव आम्हाला आला.
अखेरीस शोधत शोधत गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी एका हॉटेलमध्ये आम्हाला जेवण मिळाले. तशी तिथे गर्दी देखील बऱ्यापैकी होती. बरेच कमी हॉटेल्स चालू असल्याने कदाचित असं असावं. कोकणात आल्यावर इथल्या ओल्या नारळात बनविलेल्या मोदकांचा आस्वाद आम्ही नेहमी घेत असतो. आज देखील आम्ही आमची सवय मोडली नाही.
No comments:
Post a Comment